Saturday, March 30, 2019

विचार तर कराल

Hallo friends
सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहतायेत 2019 general elections म्हणजे जणू महासंग्राम अटीतटीची लढत आणि या सगळ्यासाठी तयार झालाय उभा देश ,
असो लोकशाही म्हणजे नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे या निवडणूक येणारच परंतु या रणधुमाळीत पक्ष प्रवेशाची आणि पक्षांतराची जी काही लाट आली आहे त्यामुळे खूप संभ्रम मनात निर्माण होतायेत . नागरिक शास्त्रात शिकवलंय की समविचारी लोक एकत्र येऊन पक्ष बांधणी करतात ,
मग हे काल एखाद्या पक्षात दाखल झालेले केवळ पदाच्या अपेक्षेने पक्षांतर केलेले उमेदवार आणि केवळ त्यांच्या glamour चा फायदा उठवून त्यांना पक्षाचे तिकीट देणारे नेते ,यात कुठे आला विचार आणि पक्षानिष्ठा ? 
हे तर फक्त संधीसाधू च राजकारण . म्हणूनच सर्व जबाबदार मतदाराणी मात्र मतदान करताना जागरूक राहून अशा संधीसाधूनां त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे .

ता.क. -ही पोस्ट कोणताही पक्ष किंवा उमेदवारांना उद्देशून नाही, कारण सगळीकडे तेच चाललंय.