Saturday, November 16, 2019

बिनपैशाचा तमाशा

आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय ते पाहून त्यापुढे कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट फिका पडावा .
मला राजकारणातील फारस कळत नाही परंतु एवढंच विचारावेसे वाटतंय की ज्या जनतेने निवडणुकी पूर्वी ज्या युती वर विश्वास ठेवून मतदान केले , निवडणूक निकाला नंतर त्या जनादेशाची सरळसरळ पायमल्ली होत नाहीये का ?
जनतेने शिवसेना भाजपच्या युतीला बहुमताचा आदेश दिला आहे आणि आता मात्र वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सर्व पक्षांकडून होतोय हा जनतेचा विश्वास घात नाही का ? हे संवैधानिक आहे काय ?
महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलेलं असताना , बळीराजा त्यात पुरता नाडलेला असताना सर्व प्रमुख नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण खेळणे योग्य आहे काय ?
उद्या काही विपरीत समीकरण करून एखादं सरकार जनतेवर लादलं जाणार असेल तर जनतेने याला कडाडून विरोध करावा .
असा अधिकार या लोकशाही राज्यात जनतेला आहे का ???

सौ तनुजा मुळे