आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय ते पाहून त्यापुढे कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट फिका पडावा .
मला राजकारणातील फारस कळत नाही परंतु एवढंच विचारावेसे वाटतंय की ज्या जनतेने निवडणुकी पूर्वी ज्या युती वर विश्वास ठेवून मतदान केले , निवडणूक निकाला नंतर त्या जनादेशाची सरळसरळ पायमल्ली होत नाहीये का ?
जनतेने शिवसेना भाजपच्या युतीला बहुमताचा आदेश दिला आहे आणि आता मात्र वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सर्व पक्षांकडून होतोय हा जनतेचा विश्वास घात नाही का ? हे संवैधानिक आहे काय ?
महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलेलं असताना , बळीराजा त्यात पुरता नाडलेला असताना सर्व प्रमुख नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण खेळणे योग्य आहे काय ?
उद्या काही विपरीत समीकरण करून एखादं सरकार जनतेवर लादलं जाणार असेल तर जनतेने याला कडाडून विरोध करावा .
असा अधिकार या लोकशाही राज्यात जनतेला आहे का ???
सौ तनुजा मुळे
मला राजकारणातील फारस कळत नाही परंतु एवढंच विचारावेसे वाटतंय की ज्या जनतेने निवडणुकी पूर्वी ज्या युती वर विश्वास ठेवून मतदान केले , निवडणूक निकाला नंतर त्या जनादेशाची सरळसरळ पायमल्ली होत नाहीये का ?
जनतेने शिवसेना भाजपच्या युतीला बहुमताचा आदेश दिला आहे आणि आता मात्र वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सर्व पक्षांकडून होतोय हा जनतेचा विश्वास घात नाही का ? हे संवैधानिक आहे काय ?
महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलेलं असताना , बळीराजा त्यात पुरता नाडलेला असताना सर्व प्रमुख नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण खेळणे योग्य आहे काय ?
उद्या काही विपरीत समीकरण करून एखादं सरकार जनतेवर लादलं जाणार असेल तर जनतेने याला कडाडून विरोध करावा .
असा अधिकार या लोकशाही राज्यात जनतेला आहे का ???
सौ तनुजा मुळे
No comments:
Post a Comment